जुलै-ऑगस्ट २०२२मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा 2 सप्टेंबरला निकाल

जालना, दि. 1 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट-2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्तप्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) पुरवणीपरीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर शुक्रवार, दि. २ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ०१.०० वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्याचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदरमाहितीची प्रिंट आऊट घेता येईल. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शालान्तप्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) पुरवणी परीक्षस प्रविष्टझालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याहीविशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत,पुनर्मुल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीनेमंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन इ. दहावीसाठी (http://verification.mh-ssc.ac.in) व बारावीसाठी (http://verification.mh-hsc.ac.in) स्वत: किंवा शाळा/ कनिष्ट महाविद्यालयामार्फतअर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचनासंकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

गुणपडताळणी साठी शनिवार, दिनांक ०३/०९/२०२२ ते सोमवार,दिनांक १२/०९/२०२२ पर्यंत व छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक ०३/०९/२०२२ ते गुरुवार दि.२२/०९/२०२२ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क(Debit Card/ Credit Card / UPI / Net Banking) याद्वारे भरता येईल.जुलै-ऑगस्ट २०२२ पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठीऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेचीछायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्यापाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील.ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिक पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठीसंबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

जुलै-ऑगस्ट २०२२मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा 2 सप्टेंबरला निकाल 

सन २०२३ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी)व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी) परीक्षेस ज्या विद्यार्थ्याना प्रविष्ट व्हायाचेआहे. अशा पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी नाव नोंदणी पत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थीतसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे व आयटीआय ( औद्योगिक प्रशिक्षण सस्था)द्वारे Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्याची आवेदनपत्र अनलाईन पद्धतीने स्विकारलीजातील. त्यांच्या तारखा मंडळामार्फत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.

मार्च २०२२ मध्ये प्रथम नोंदणी करून परीक्षेत उत्तीर्णझालेल्या नियमित विद्यार्थ्यांना त्याची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/ गुणसुधार(Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत परीक्षेस पुनःश्च प्रविष्ट होण्याची संधीउपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्च २०२२ परीक्षेसाठी प्रथमच प्रविष्ठ झालेल्या नियमितविद्यार्थ्यांना श्रेणीसुधारसाठी मार्च २०२३ परीक्षा ही अतिम संधी असेल याची नांद घ्यावी,त्यामुळे त्यापूर्वीच असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परक्षार्थी विद्यार्थीयांना श्रेणीसुधार योजनेतंर्गत परीक्षेस प्रविष्ठ होता येणार नाही, असे महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment