भाजप मध्ये गेलेल्या नेत्यांसाठी राष्ट्रवादी राबवणार – “घरवापसी अभियान” || NCP Gharwapasi Mission Bringing Back Those WhO Had Joined The BJP
महाविकास आघाडी सरकार पडण्याचे नवे नवे केले जात आहे यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या जुन्या नेत्यांना परत पक्ष प्रवेशासाठी “घरवापसी अभियान”(GHARWAPASI MISSION) राबवणार आहे. 2019 विधानसभा निवडणुकी आधी अनेक राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडली होती. विकासाची काम करण्यासाठी आपण भाजप पक्ष प्रवेश करत असल्याचे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता महाविकास आघाडी सरकार आल्यावर या राष्ट्रवादीतील नेत्यांना परत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करायचा आहे, अशा नेत्यांना परत आणण्याची जबाबदारी शरद पवार यांनी उप मुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सोपवली आहे.
भाजप नेते एकीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पडणार असा दावा करत असताना तसंच ऑपरेशन लोटसच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत असताना, भाजपला धक्का देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या नेत्यांना परत बोलण्यासाठी “घरवापसी मिशन” (GHARWAPASI MISSION) राबवणार आहे.
राजस्थान मध्ये भाजप चे सत्ता स्थापनेचे प्रयोग अयशस्वी झाल्यावर महाराष्ट्रात कांग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्हीही पक्ष सतर्क आहेत. महाविकास आघाडी चे सरकार असल्याने प्रत्येक जिल्ह्यातील कांग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस तीनही पक्षाचं राजकारण, पक्षाची ताकद पाहून गेलेल्या नेत्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे. आमदारांना तसेच नेत्यांना घेताना शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.
निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे कोणते नेते गेले होते भाजपमध्ये..
- उदयनराजे भोसले – सातारा
- शिवेंद्रराजे भोसले – सातारा
- राणाजगजितसिंह पाटील – उस्मानाबाद
- धनंजय महाडिक – कोल्हापूर
- बबनराव पाचपुते – श्रीगोंदा
- रणजितसिंह मोहिते-पाटील – माळशिरस
- मधुकर पिचड – अकोले
- गणेश नाईक – नवी मुंबई