मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना
राज्यात ‘अटल‘ सौर कृषीपंप योजना राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासमवेत राज्य शासनाने1 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी3 वर्षांच्या कालावधीत टप्याटप्यात करण्यात येणार आहेत.
q सौरकृषीपंपाचे फायदे
q दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता
q दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा
q वीज बिलापासून मुक्तता
q डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च
q पर्यावरण पुरक परिचलन
q शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून पृथ्थकरण करणे
q औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा बोजा कमीकरणे
q नवीन शासन निर्णय
· राज्यात ‘अटल‘ सौर कृषीपंप योजना राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासमवेत राज्य शासनाने १ लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी ‘मुख्यमंत्री‘ सौर कृषीपंप योजना राबविण्यास शासन निर्णय क्र. सौरप–२०१८/प्र.क्र.४०१/उर्जा-7,दि.१५ नोव्हे.२०१८ अन्वये मंजूरी दिली आहे. या योजनेत सौर कृषीपंप ३ वर्षांच्या कालावधीत टप्याटप्यात आस्थापित करण्यात येणार आहेत. प्रत्येक टप्पा प्रत्यक्ष सुरु झाल्यापासून पुढील १८ महिन्यात पूर्ण करावयाचा असून प्रथम टप्यात २५,०००० नग सौर कृषीपंप आस्थापनेचे उदिद्ष्ट देण्यात आले आहे.
· पहिला टप्पा – २५००० नग
· दुसरा टप्पा – ५०००० नग
· तिसरा टप्पा – २५००० नग
q अर्जाची प्रक्रिया
पारेषण विरहीत सौर कृषीपंप नविन वीज जोडणी करिता अर्जाची प्रक्रिया.
1. महावितरणाच्या वेब पोर्टलवर (https://www.mahadiscom.in/solar) ऑनलाइन अर्ज करावा.
o सध्याच्या कृषीपंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करुन प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इ. तपशील देणे अनिवार्य आहे.
o नवीन अर्जदार (परंपरागत कृषीपंप नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा केलेला नाही) सर्व फील्ड अनिवार्य आहेत म्हणून तपशील भरणे आवश्यक आहे.
2. ए – 1 फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावीे सोबत (कागदपत्रांची प्रत अपलोड करावी)
o 7/12 उतारा प्रत
o आधार कार्ड
o कास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी)
3. अर्जदाराने ए – 1 फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे.
4. ऑनलाइन ए – 1 फॉर्म प्राप्त झाल्यापासून 10 दिवसांच्या आत, सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल. जर काही विसंगती आढळली तर त्यानुसार अर्जदाराला कळविण्यात येईल.
5. डिमांड नोट देय झाल्यानंतर लाभार्थी एजन्सीचे नाव सादर करेल / देईल (केवळ 25000 निविदासाठी लागू आहे).
6. प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.
q लाभार्थींसाठी मार्गदर्शक सुचना
1. यायोजनेतखालीलप्रमाणेनविनतसेचप्रलंबितअर्जदारपात्रराहतील.
o पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार (मार्च 2018 पूर्वी ज्यांना एचव्हीडीएस योजनेमध्ये 2.5 लाखांहून अधिक रकमेच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.)
o 31.03.2018 नंतर सर्व पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार.
o 01.01.2019 पासून कृषी पंपासाठी सर्व नवीन अर्जदार.
o 2.5 लाखापेक्षा कमी रकमेच्या पायाभूत सुविधा लागणाऱ्या एचव्हीडीएस मधील पैसे भरुन प्रलंबित असलेला व या योजनेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेला अर्जदार.
2. लाभार्थीनिवडीसाठीपात्रतानिकष
o सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी. मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसावी.
o 5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत सौर कृषीपंप व 5 एकरापर्यंत जास्त शेतजमीन धारकास शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय आहे.
o राज्यातील पारंपारिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी
o विद्युतीकरणासाठी वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसै भरुन ही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी / शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी.
o अतिदुर्गम भागातील शेतकरी.
o महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
o वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहिर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील.
o सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित ़जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे.
o अटल सोलर योजनेमध्ये अर्जदाराने आधी लाभ घेतलेला नसावा.
q योजनेची ठळक वैशिष्टे
q पारेषण विरहित 1 लाख सौरकृषी पंप टप्प्या टप्प्यात उपलब्ध करुन देणे.
q सौर कृषीपंपासोबत दोन डि.सी. एल.ई.डी बल्ब, मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगची सुविधा (बॅटरी लाभार्थांनी घ्यावी) यांचा समावेश
q या योजनेत सहभागी होण्यासाठी शासन निर्णय व आदेशातील पात्रता अटी व शर्तीनुसार लाभार्थ्यांना भरावयाची रक्कम:
q वर नमूद केलेल्या भरावयाच्या रक्कमेतून लाभार्थ्यानी महावितरणकडे या अगोदर नविन कृषीपंपासांठी (प्रलबिंत) वीज जोडणीसाठी भरलेली रक्कम समायोजित करुन उर्वरित शिल्लक रक्कमेचा भरणा करावयाचा आहे. याकरीता लाभार्थ्यानी समंती पत्र देणे आवश्यक असून ते महावितरण कंपनीच्या संबंधित उपविभागीय कार्यालयात सौर कृषीपंपाच्या मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
q याबाबतची संपूर्ण माहिती महावितरण कंपनीच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.वर दर्शविलेल्या रक्कमेचा भरणा यथाशिघ्र करुन संबंधित महावितरण कार्यालयास अवगत करणे आवश्यक आहे. जेणे करुन लाभार्थ्यांचे नाव सौर कृषीपंप योजनेमध्ये समाविष्ट करुन सौर कृषीपंपासाठी पात्र लाभार्थी म्हणून घोषित करण्यात येईल.
q लाभार्थीसाठी उपलब्ध इतर सेवा
- मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत सर्व प्रमुख टप्प्यांसाठी लाभार्थीला त्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएस पाठविला जातो आणि त्याच्या नोंदणीकृत ई–मेल आयडीवर ई–मेल पाठविला जातो.
- नोंदणीकृत मोबाइल नंबरमध्ये बदल करावयाचा असल्यास (ए 1 फॉर्म भरताना भरलेला ) संबंधित मंडळाच्या अधिक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधावा.
- तक्रार नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेः तक्रार निवारण कॉल सेंटर नंबर 18001023435 / 18002333435 वर कॉल करा किंवा AGSOLAR@MAHADISCOM.INवर ई–मेल पाठवा.
- लाभार्थी महावितरण मोबाइल अॅपद्वारे अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतो. एक वेगळा टॅब ऑफ–ग्रिड सोलर अॅग्री पंप स्टेटस आहे जेथे लाभार्थी अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतो .
- जर एखाद्या अर्जाची सध्याची स्थिती “ए 1 फॉर्म नाकारला आहे” असेल तर अस्वीकार करण्याचे कारण देखील नमूद केलेले असते.
अधिक माहिती समजून घेण्यासाठी खालील विडिओ पहा ..!!!!