महाराष्ट्र बातम्या

टॅब वाटपाबाबतच्या अपप्रचाराला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये – महाज्योतीचे आवाहन

दि. 21 जानेवारी २३ (आजचा साक्षीदार): महाज्योतीने संबंधित जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांमार्फत टॅब वाटपाचे नियोजन पूर्ण केलेले असून नोंदणीकृत प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब मिळेल याची दक्षता घेतलेली आहे. त्यामुळे टॅब वाटपाबाबत पसरविल्या जाणाऱ्या अपप्रचाराला विद्यार्थी व पालक यांनी बळी पडू नये, असे आवाहन महाज्योती मार्फत करण्यात आले आहे.

जी, निट, एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप करण्याची महत्वाकांक्षी योजना महाज्योतीमार्फत राबविण्यात येते. महाज्योतीकडे नोंदणीकृत विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्याचे कार्य महाज्योतीने हाती घेतलेले असून वाटपाच्या कामास गती देण्यात आलेली आहे. आजपर्यंत सन 2023 च्या प्रशिक्षणासाठी नोंदणी झालेल्या धुळे, नंदुरबार, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आलेले आहे. तसेच वर्धा जिल्ह्यात सन 2023 व 24 या वर्षाच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी झालेल्या वर्धा जिल्हयातील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।
महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।

पुणे, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड सहित इतर उर्वरीत सर्व जिल्हयात JEE/NEET/MHT-CET चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप करण्याकरीता संबंधित जिल्ह्यांचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच वाटपाची प्रक्रीया सुरळीत पार पाडावी, यासाठी लेखी मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

विधानपरिषदेची शिक्षक व पदवीधर मतदार संघाकरिता निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने 4 फेब्रुवारीनंतर उर्वरित विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी टॅब वाटप करण्यात येणार आहे. टॅब वाटपाचा दिनांक व वेळ महाज्योती कार्यालयामार्फत नोंदणीकृत विद्यार्थ्यांना त्यांच्या संपर्क क्रमांकावर कळविण्यात येणार आहे

टॅब वाटपाबाबतच्या अपप्रचाराला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये - महाज्योतीचे आवाहन

टॅब वाटपाबाबतच्या अपप्रचाराला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये – महाज्योतीचे आवाहन

महाज्योतीने संबंधित जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांमार्फत टॅब वाटपाचे नियोजन पूर्ण केलेले असून नोंदणीकृत प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब मिळेल याची दक्षता घेतलेली आहे. त्यामुळे टॅब वाटपाबाबत पसरविल्या जाणाऱ्या अपप्रचाराला विद्यार्थी व पालक यांनी बळी पडू नये, असे आवाहन महाज्योती मार्फत करण्यात आले आहे.

व्हिजन 2047: शिखर संमेलन। पर्यावरण संवर्धन अभियानाला जनचळवळीचे स्वरूप यावे :वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

व्हिजन 2047: शिखर संमेलन। पर्यावरण संवर्धन अभियानाला जनचळवळीचे स्वरूप यावे :वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

न‍िसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण आणि जल संवर्धन काळाची गरज असून याला जनचळवळीचे स्वरूप यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने वाहन कर न भरलेल्या व विविध मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, आळंदी रोड कार्यालय, वाघेश्वर वाहनतळाच्या आवारात अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी मोटार वाहन कर व दंड भरुन सोडवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना । शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना । शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्याला 220 शेततळ्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून शेतक-यांना शेततळ्यासाठी कमाल 75 हजार रुपयाच्या मर्यादेत शेततळ्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यात 500 आपदा मित्र प्रशिक्षित होणार

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यात 500 आपदा मित्र प्रशिक्षित होणार

जिल्ह्यात हमीदा एज्युकेशन सोसायटीज डॉन ॲकॅडमी (सिडनी पॉईंटरोड) पाचगणी ता.महाबळेश्वर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 500 आपदा मित्र स्वयंसेवक यांना आपत्ती व्यवस्थापन या विषयाबाबत 12 दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 5 आपदा मित्र स्वयंसेवकांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात मोफत आपत्कालीन प्रतिसाद किट देण्यात आले. शासनामार्फत या आपदा मित्रांचा सुरक्षा विमा उतरविला जाणार आहे. हे प्रशिक्षण सातारा जिल्ह्यातील दुर्घटना, संभाव्य धोके टाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.

पुणे-मिरज रेल्वेची दुसरी मार्गिकेसाठी भूसंपादन पूर्ण । रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात

पुणे-मिरज रेल्वेची दुसरी मार्गिकेसाठी भूसंपादन पूर्ण । रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेसाठी आवश्यक भूसंपादनाची १०० टक्के कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात आहे. दुहेरी मार्गावरुन रेल्वेवाहतूक सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, व्यापारी, नोकरदारांसाठी गतीमान प्रवासाची सोय होणार असून परिसरातील अर्थविकासाला चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.

सामाजिक जाणीव आणि लोकसहभागातुन नद्यांचे पुनरुज्जीवन करावे - जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

सामाजिक जाणीव आणि लोकसहभागातुन नद्यांचे पुनरुज्जीवन करावे – जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन लोकसहभागातून अकोल्यातील मोरणा व संभाजीनगर च्या खाम नदीचे पुनरुज्जीवन केल्याबद्दल जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय व त्यांच्या सहकार्याच्या कामाचे कौतुक करत या उपक्रमाचा आदर्श महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांनी घ्यावा, असे गौरवोद्गार काढले.

समुदाय आरोग्य अधिकारीपदासाठी रविवार दि.२२ रोजी प्रवेश परीक्षा

समुदाय आरोग्य अधिकारीपदासाठी रविवार दि.२२ रोजी प्रवेश परीक्षा

अकोला परिमंडळासाठी समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी होणारी प्रवेश परीक्षा ही रविवार दि.२२ रोजी अकोला येथे होणार आहे. संबंधित उमेदवारांचे प्रवेश पत्र हे शासनाच्या आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, असे अकोला मंडळ उपसंचालक आरोग्य डॉ. तरंगतुषार वारे यांनी कळविले आहे.

फेब्रुवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण

फेब्रुवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण

जिल्ह्यासाठी माहे फेब्रुवारी महिन्यासाठी लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य, नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे. वाटप परिमाण व दर याप्रमाणे-

रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी अँपद्वारे पीक पेरा नोंदवण्यासाठी तीन दिवसीय विशेष मोहिम - 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत मोहिम

रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी अँपद्वारे पीक पेरा नोंदवण्यासाठी तीन दिवसीय विशेष मोहिम – 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत मोहिम

शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, पीक नोंदणी प्रक्रीयेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग वाढवा, कृषी पतपुरवठा धोरण सुलभ व्हावे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेतंर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने ई-पीक पाहणी उपक्रम सुरु केला आहे.