महाराष्ट्र शासन योजना

प्रसिद्धीपत्रक – वाळू लिलाव बंद होणार आणि आता डेपोतूनच वाळू ६०० रुपयात मिळणार | सर्वसामान्यांसाठी वाळू स्वस्त! ६०० रुपये प्रती ब्रास दरात मिळणार वाळू!

मुंबई, दि. ५ : राज्यातील सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्याच्या महसूल विभागाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर मंत्रीमंडळाने आज शिक्कामोर्तब केल्याने ६०० रुपये प्रती ब्रास दरात वाळू उपलब्ध होणार आहे, तसेच यामुळे जनसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किंमतीही आवाक्यात येतील. वाळू लिलाव बंद होणार असल्याने डेपोतूनच ६०० रुपयात वाळू उपलब्ध होईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिली. मुंबई मंत्रालय येथील दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली.

महसूलमंत्र्यांचा जनसामान्यांना दिलासा! घरांच्या किंमतीही आवाक्यात

राज्यातील वाळू लिलाव प्रक्रियेवरुन सातत्याने अनेक तक्रारी येण्याबरोबरच अनियमिततेला आळा घालण्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी घेत राज्यात थेट नवीन वाळू धोरण आणण्याचे निश्चित केले. याच वाळू धोरणावर मंत्रीमंडळाने आज शिक्कामोर्तब केले. या धोरणानुसार वाळू गटातून वाळुचे उत्खनन, उत्खननानंतर वाळुची डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर 1 वर्षासाठी संपूर्ण राज्यासाठी रुपये 600/- प्रती ब्रास (रुपये 133/- प्रती मेट्रीक टन) वाळू विक्रीचा दर निश्चित करुन स्वामित्वधनाची रक्कम माफ करण्यात येणार आहे. याशिवाय वाळू वाहतूकीचा खर्च नागरीक करतील, अशी तरतूद करण्यात आली आहे. यासाठी शासना मार्फत आकारण्यात येणारे जिल्हा खनिज प्रतिष्ठाण निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क, इत्यादी खर्च अनिवार्य राहील, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री विखे- पाटील यांनी दिली.

लिलाव बंद होणार आणि आता डेपोतूनच वाळू ६०० रुपयात मिळणार – महसूल विभागाच्या निर्णयावर मंत्रीमंडळाचे शिक्कामोर्तब

नवीन वाळू धोरणातील महत्त्वाच्या गोष्टी :

➢ राज्यातील नागरिकांना स्वस्त दरात वाळू / रेती मिळावी तसेच अनाधिकृत उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत अपर जिल्हाधिकारी / जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर समिती स्थापन करून वाळू / रेती उत्खनन, साठवणूक व डेपो व्यवस्थापन आणि ऑनलाईन प्रणालीव्दारे वाळू डेपोतून वाळू विक्री करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
➢ केंद्र शासानाच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय, खणिकर्म विभाग, मा. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी पारित केलेले आदेश/निर्देश/अटी व शर्ती विचारात घेवून पर्यावरण अनुमती व खाणकाम आराखडा इत्यादीबाबत कार्यवाही करण्यात येईल.
➢ यापूर्वी राज्यातील नागरीकांना प्रति ब्रासनुसार वाळू विक्री करण्यात येत होती. त्यामध्ये आता बदल करून, प्रतिमेट्रीक टनामध्ये वाळू विक्री करण्यात येणार आहे.
➢ नदी/खाडीपात्रातील वाळू/रेती उत्खनन, वाहतूक, डेपोनिर्मीती व व्यवस्थापन यासाठी ई-निविदा काढून निविदाधारक निश्चित करण्यात येणार आहे.
➢ वाळू डेपोमधून “महाखनिज” अथवा शासन निश्चित करेल त्या ऑनलाईन प्रणालीव्दारे वाळू विक्री करण्यात येईल.
➢ वाळू डेपो निर्मितीसाठी शहराजवळ/गावाजवळ शक्यतो शासकिय जमिनी निश्चित केली जाईल. ज्याठिकाणी शासकीय जमिन उपलब्ध होणार नाही. तेथे खाजगी जमीनी भाडे तत्वावर घेण्यात येतील.
➢ नदी/खाडी पात्र ते डेपो पर्यंतचे क्षेत्र Geo fencing करण्यात येईल
➢ प्रत्येक वाळू डेपोजवळ वाळूचे मोजमाप करण्यासाठी वजनकाटे (वे-ब्रीज) उभारण्यात येतील. सदर ठिकाणी CCTV व काटेरी कुंपण घालण्यात येईल .
➢ वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना GPS प्रणाली बसवणे बंधनकारक करण्यात येईल.
➢ प्रथम तीन वर्षासाठी अथवा सदर वाळूगटातील वाळु संपेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्याकालावधीकरीता वाळू उत्खनन, वाहतूक व साठवणूक याबाबतची निविदा काढण्यात येतील.
➢ नदी/खडी पात्रातून डेपो पर्यंत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहणांना विशिष्ट रंग देण्यात येईल.
➢ वाळू डेपोतून नागरीकापर्यंत वाळू पोहचविण्यासाठी येणार खर्च नागरिकांना करावा लागेल.

महसूल विभागाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केल्याने डेपोतूनच ६०० रुपये प्रती ब्रास दरात वाळू उपलब्ध होणार आहे. यामुळे वाळू लिलाव बंद होणार असून घरांच्या किमती आवाक्यात येऊन जनसामान्यांना दिलासा मिळणार आहे- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


सौजन्य – जनसंपर्क कक्ष (महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री महोदय यांचे कार्यालय)

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

वाळू लिलाव बंद होणार आणि आता डेपोतूनच वाळू ६०० रुपयात मिळणार | सर्वसामान्यांसाठी वाळू स्वस्त! ६०० रुपये प्रती ब्रास दरात मिळणार वाळू!

वाळू लिलाव बंद होणार आणि आता डेपोतूनच वाळू ६०० रुपयात मिळणार | सर्वसामान्यांसाठी वाळू स्वस्त! ६०० रुपये प्रती ब्रास दरात मिळणार वाळू!

जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

Maharashtra Sarkari Yojna | महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या या काही प्रमुख सरकारी योजना

महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांचा विकास, कल्याण आणि सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी विविध योजना आणि धोरणे लागू केली आहेत. या योजना आणि धोरणांमध्ये कृषी, सिंचन, उद्योजकता, आरोग्य, शिक्षण आणि समाजकल्याण अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. राज्य सरकारने, केंद्र सरकारच्या भागीदारीत, गरिबी, बेरोजगारी आणि पर्यावरणाचा ऱ्हास या आव्हानांना तोंड देण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांनी महाराष्ट्रातील लोकांचे जीवनमान सुधारण्यात आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. एकंदरीत, सर्वसमावेशक वाढ आणि विकासावर सरकारचे लक्ष कौतुकास्पद आहे आणि महाराष्ट्राला आणखी प्रगती आणि समृद्धीकडे नेण्याची अपेक्षा आहे.

कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार ही तीन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून आज राहुरी कृषी विद्यापीठाचे कामकाज सुरू आहे. नगर, मनमाड या महामार्गावर अहमदनगरपासून ३५ कि.मी. अंतरावर असलेले हे विद्यापीठ आज महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक शेतकऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे.

नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | कृषी शिक्षणाची पंढरी – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार ही तीन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून आज राहुरी कृषी विद्यापीठाचे कामकाज सुरू आहे. नगर, मनमाड या महामार्गावर अहमदनगरपासून ३५ कि.मी. अंतरावर असलेले हे विद्यापीठ आज महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक शेतकऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे.

मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स!

मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स!

महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी

महाशिवरात्रिसाठी बाजारात आता सर्टिफाईड रुद्राक्ष व रत्ने ! आधुनिक पूजा सामुग्री

महाशिवरात्रिसाठी बाजारात आता सर्टिफाईड रुद्राक्ष व रत्ने ! आधुनिक पूजा सामुग्री

अहमदनगर औरंगाबाद रस्त्यावर अहमदनगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.

परिपत्रक – ‘आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीमधील तक्रारींबाबत करावयाची कार्यवाही.’

आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीमधील तक्रारींबाबत करावयाची कार्यवाही.

अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या नेवासे (पूर्वीचे निधीनिवास) गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा नेवासे परिसरातलेच. करविरेश्वराच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसत असत, तो १.५ मीटर उंचीचा दगडी पैस खांबावर आज भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.

उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष • निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी उमरी बँक, पोलीस स्टेशन हल्ल्याच्या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण

उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष • निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी उमरी बँक, पोलीस स्टेशन हल्ल्याच्या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण

इंद्रायणी थडी जत्रेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन | देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल - उपमुख्यमंत्री

इंद्रायणी थडी जत्रेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन | देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल – उपमुख्यमंत्री

इंद्रायणी थडी जत्रेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन | देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल - उपमुख्यमंत्री

देव आहे पण देऊळ नाही, घर आहे पण दारे नाहीत, झाड आहे पण सावली नाही... ही आगळी-वेगळी वैशिष्ट्ये असलेले शनींचे जागृत देवस्थान शनिशिंगणापूर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. उघड्या चौथऱ्यावर पाच फूट नऊ इंच उंचीची दगडी शिळा असून तेथे अखंड तेलाचा अभिषेक केला जातो.

शेतजमिनीचा वाद मिटविण्यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्याची ‘सलोखा योजना’

शेतजमिनीचा वाद मिटविण्यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्याची ‘सलोखा योजना’

अहमदनगर औरंगाबाद रस्त्यावर अहमदनगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.

प्रजासत्ताक दिनी २५ वर्ष सुरक्षित सेवा बजावणाऱ्या जिल्ह्यातील ४२ एसटी चालकांचा सत्कार

प्रजासत्ताक दिनी २५ वर्ष सुरक्षित सेवा बजावणाऱ्या जिल्ह्यातील ४२ एसटी चालकांचा सत्कार