महाराष्ट्र शासन योजना

जिल्ह्यातील 100 टक्के गावांमध्ये लवकरच प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

सातारा, दि. २५ (आजचा साक्षीदार) – सातारा जिल्ह्यातील सर्व गावंमधील प्रत्येक घरात जलजीवन मिशनच्या माध्यमातून लवकरच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळाद्वारे करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील योजनांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

पाटण तालुक्यातील मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक सभागृहामध्ये पाटण तालुक्यातील १४० गावातील नळ पाणी योजनांचे ई भूमिपूजन पाणी पुरवठा मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या कार्यक्रमावेळी पाणी पुरवठा मंत्री श्री. पाटील बोलत होते.

यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल,जल जीवन मिशन प्रकल्प संचालक ऋषिकेश यशोद (दूरदृश्य प्रणालीव्दारे )मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार रमेश पाटील,जल जीवन मिशनचे कार्यकारी अभियांता सुनील शिंदे, गट विकास अधिकारी गोरख शेलार उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, ‘हर घर जल’ या संकल्पनेतून जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावतील प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तिसाठी पाणी पोहोचविण्याचा मानस आहे. या मिशनच्या माध्यमातून शासन घरोघरी नळ पाणी जोडणी देत असल्याचे सांगितले. राज्यातील प्रत्येक घरात नळ पाणी पुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे.

नळ जोडणी कामे लवकर व्हावीत म्हणून या बाबतचे अधिकार जिल्हास्तरावर देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व योजनांना मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ही कामे जलद पूर्ण होण्याच्या दृष्टीने कामांचा दर महा आढावा घ्यावा व त्याची प्रगती एका नोंद वहीत ठेवावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पेय जल कार्यक्रम जल जीवन मिशन मध्ये समाविष्ट करुन या मिशन अंतर्गत सन २०२४ अखेर ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला नवीन वैयक्तिक नळजोडणी व पूर्नजोडणीद्वारे प्रतीदिन दरडोई किमान ५५ लिटर पाणी पुरवठा करण्यास शासन कटीबध्द आहे. या योजनेसाठी केंद्रशासन ५० टक्के, राज्यशासन ५० टक्के अशी निधीची उपलब्धता असल्याची माहिती मंत्री श्री पाटील यांनी यावेळी दिली.

जल जीवनच्या १४० कामांना मंजुरी, सातारा जिल्ह्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी मिळणार – मंत्री शंभूराज देसाई

जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा लवकरच होणार आहे.पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती. या भागातील पाणी पुरवठ्यांच्या योजनांना आम्ही प्राधान्य दिले. पाटण तालुक्यातील १४० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचा आज शुभारंभ झाला असून या गावांतील योजनांसाठी निधी मंजूर झाला आहे.या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे डोंगरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आता दूर होणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे . अनेक योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकास कामांसाठी निधी शासनाने दिला. जलजीवन मिशन माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी ही निधी आणला.

पाटण तालुक्यातील एकूण ८८ कोटी ४२ लाख रुपयांच्या १४० नळ पाणी योजनांचे भूमिपूजन करण्यात आले. या माध्यमातून एकूण १ लाख ५३ हजार ३१० लोकसंख्येला पाणी मिळणार आहे. एकूण ३६ हजार ९४१ घरांमध्ये नळ जोडणी देण्यात येणार आहे. या शिवाय तालुक्यातील ३४० गावांमधील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जिल्ह्यातील 100 टक्के गावांमध्ये लवकरच प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील 100 टक्के गावांमध्ये लवकरच प्रत्येक घराला शुद्ध  पिण्याचे पाणी - पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

महाराष्ट्रातील सागर परिक्रमेसाठी संपूर्ण सहकार्य मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित आढावा बैठक

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा | ग्रंथ विक्री प्रदर्शनास दिल्लीकर मराठी भाषिकांचा चांगला प्रतिसाद

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा | ग्रंथ विक्री प्रदर्शनास दिल्लीकर मराठी भाषिकांचा चांगला प्रतिसाद

महाडीबीटी पोर्टलच्या महाविद्यलय, विद्यार्थी लॉगीनवरील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन | MAHADBT

शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन | MAHADBT

११ जानेवारी रोजी फेरफार अदालत । फेरफार अदालतीमध्ये उपस्थित राहून प्रलंबित नोंदी निर्गत करून घ्याव्यात -जिल्हाधिकारी

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘वाचक वाढवा अभियान’

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘वाचक वाढवा अभियान’

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

एक मोठा दिलासा | महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशन कार्ड धारक समाविष्ट…मिळतो ५ लाखांपर्यंत फायदा

एक मोठा दिलासा | महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशन कार्ड धारक समाविष्ट...मिळतो ५ लाखांपर्यंत फायदा

शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 | मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून धरणार ग्राह्य

शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 | मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून धरणार ग्राह्य

विशेष लेख | पशुपालन;पशुकल्याण आणि भूतदया

दिनांक १४ ते २८ जानेवारी हा पंधरवडा 'पशुकल्याण पंधरवडा ' म्हणून साजरा करण्यात येत आहे. पशुधनासंबंधी देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.  तेव्हा आपल्याला पशुकल्याण ' म्हणजे नेमके काय असा प्रश्न पडू शकतो.

कुष्ठरोग निर्मूलनासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती मोहिम राबवावीदिले – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

कुष्ठरोग निर्मूलनासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती मोहिम राबवावीदिले - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

आजचा साक्षीदार | दिवसभरातील महत्वाच्या टॉप बातम्या : 23 जानेवारी 2023

आजचा साक्षीदार | दिवसभरातील महत्वाच्या टॉप बातम्या : 23 जानेवारी 2023

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची विविध शासकीय कार्यालयाच्या कार्यवाहीत 2 हजार 200 रुपयाचा दंड वसूल

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची विविध शासकीय कार्यालयाच्या कार्यवाहीत 2 हजार 200 रुपयाचा दंड वसूल