महाराष्ट्र शासन योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातच उपलब्ध

पुणे दि. 11 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी एम किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास २ हजार रुपये हप्त्याप्रमाणे प्रती वर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

या योजनेअंतर्गत १४ व्या हप्त्याचा लाभ माहे मे किंवा जून मध्ये जमा होणार असून केंद्र शासनाने १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. राज्यात सद्यस्थितीत १२ लाख ९१ हजार लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधारक्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात १४ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.

यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांक इत्यादीच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडीया पोस्ट पेमेंट बँकत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे. हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासात जोडले जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबी मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थीना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही.

पी. एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थीची बँक खाती आयपीपीवी मध्ये उघडून तो आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थीना संपर्क करून आयपीपीबी मध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबर मार्फत १५ मे २०२३ पर्यंत गाव पातळीवर सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे.

आयपीपीबी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थीनी त्यांचे बँक खाते उघडून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषी आयुक्त श्री. चव्हाण यांनी केले आहे.

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातच उपलब्ध

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी एम किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास २ हजार रुपये हप्त्याप्रमाणे प्रती वर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

खरीप हंगाम 2023-24 साठी जिल्हयात मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने नियोजन केले आहे. पीक संरचनेतील बदल व खत वापराच्या शिफारशी प्रमाणे जिल्हयासाठी एकुण 89 हजार 318 मे.टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली असून 80 हजार 180 मे.टन खताचे आवंटन व 28 हजार 350 बॉटल नॅनो युरीयाचे आवंटन शासनाकडून प्राप्त झाले आहे. रब्बीतील सुमारे 29 हजार 526 मे.टन साठा जिल्हयामध्ये शिल्लक आहे.

डीबीटी पोर्टल | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग | मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्ती

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेस ३० मे पर्यंत मुदतवाढ | डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याचे समाज कल्याण आयुक्तांचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांकरीता सन २०२२-२३ मध्ये नवीन व नुतनीकरण अर्ज करण्यासाठी प्रक्रियेस ३० मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून अर्ज भरावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

फलटण येथील शासकीय वसतीगृहात प्रवेश सुरु | Phaltan Hostel Admission Starts

फलटण येथील शासकीय वसतीगृहात प्रवेश सुरु | Phaltan Government Hostel Admission Starts

फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. इ. 8 वी ते 10 वी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. मोफत भोजन, निवास, नाष्टा, दूध, फळे, अंडी, बेडिंग साहित्य तसेच शैक्षणिक साहित्य पुरविली जातात. तसेच प्रवेशितांना दरमहा रु. 500/- निर्वाहभत्ता दिला जातो.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ | उद्योग/व्यवसाय करण्यासाठी कर्जाचे अर्ज स्वीकृती

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे आवाहन | उद्योग/व्यवसाय करण्यासाठी कर्जाचे अर्ज स्वीकृतीचा कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा मार्फत यापुर्वी कोणत्याही प्रकारचा लाभ न घेतलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील वैयक्तीक अर्जदारांना उद्योग/व्यवसाय करण्यासाठी प्राप्त उद्दीष्टानुसार विविध बँकांमार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याकरीता कर्जाचे अर्ज स्वीकृतीचा कार्यक्रम दि. 11 मे 2023 ते दि. 9 जुन 2023 दरम्यान (सुट्टीचे दिवस वगळुन) वेळ सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00 वाजता संबंधित महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळ मजला, जिल्हाधिकारी कार्यालय समोर जालना येथे घेण्यात येणार आहे.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ | राज्य शासनाच्या अनुदान योजना व बीज भांडवल योजना | केंद्र शासनाची एनएसएफडीसी योजना

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातंर्गत चर्मकार बांधवांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाच्या (चांभार, मोची, ढोर व होलार) व्यक्तीचे जीवनमान उंचावणे, समाज प्रवाहात मानाचे स्थान मिळविण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध शासकीय योजना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये खालील योजना राबविण्यात येणार आहेत.

हिंगोली, दि. 10 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार महिला व बालविकास विभागांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, कैद्याची पाल्य, एकपालक, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेल्या निकषानुसार बालकांना शैक्षणिक सहाय्यासाठी बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.

बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

हिंगोली, दि. 10 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार महिला व बालविकास विभागांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, कैद्याची पाल्य, एकपालक, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेल्या निकषानुसार बालकांना शैक्षणिक सहाय्यासाठी बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

तालुकास्‍तरीय शासकीय विभागांनी शासकीय योजनांचा व्‍यापक स्‍वरुपात प्रचार-प्रसार करावा – उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील | “जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्‍यांच्‍या विकासाची”

सर्व शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी योजनांचा प्रचार-प्रसार व्‍यापक स्‍वरुपात झाला पाहिजे. समाजातील तळागाळातील गरजु गरीब लोकांना योजनांचा लाभ मुदतीत मिळावा यासाठी तालुकास्‍तरीय सर्व विभागांनी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. असे मत अहमदनगरचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी व्‍यक्‍त केले. "जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्‍यांच्‍या विकासाची" याबाबत उपविभागीय कार्यालयाच्‍या सभागृहात आयोजीत तालुकास्‍तरीय आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ‘ब्लू प्रिंट’ तयार करावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | आपत्ती व्यवस्थापन, शासन आपल्या दारी उपक्रम तसेच जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा घेतला आढावा

जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची 'ब्लू प्रिंट' तयार करावी - पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | आपत्ती व्यवस्थापन, शासन आपल्या दारी उपक्रम तसेच जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा घेतला आढावा

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांचे आवाहन

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी लातूर येथे आज मुलाखतींचे आयोजन | ‘जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे आयोजन | Jobs in Latur

नोकरीसाठी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खासगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम अर्थात ‘जागेवरच निवड संधी’चे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत 10 मे 2023 रोजी लातूर येथे मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी कळविले आहे.