शेती

साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती करावी. -केद्रीय मंत्री नितीन गडकरी

सातारा दि. २७(आजचा साक्षीदार) : महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. ऊसापासून इथेनॉल निर्मिती करता येते. पेट्रोलपेक्षा इथेनॉलचे दर खूप कमी आहेत. पुढील काळात इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्यात येणार आहे. तरी साखर कारखानदारांनी इथेनॉलच्या निर्मितीसाठी आपला पुढाकार घ्यावा यातून निश्चितच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

फलटण येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे उंडवडी कडेपठार-बारामती-फलटण रस्ता चौपदरीकरण व कॉक्रिटी करण, शिंदेवाडी-भोर-वरंधाघाट रस्ता राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व कॉक्रिटीकरणाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण आणि लोणंद-सातारा रस्ता मजबुतीकरणाचे लोकार्पण डिजिटल पध्दतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री रामराजे नाईक निंबाळकर, दीपक चव्हाण, शहाजी पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधिक्षक समीर शेख, राष्ट्रीय महामार्गाचे संतोष शेलार आदी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी सन 2014 पर्यंत 49.04 कि.मी. होती तर आता ही लांबी 858 कि.मी. झाली आहे असे सांगून श्री. गडकरी म्हणाले, आळंदी ते पंढरपूर हा बारा हजार कोटींचा पालखी मार्ग येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल. या मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या पालखी मार्गाचे महाराष्ट्रातील साधुंसंताच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. हा उद्घाटनाचा कार्यक्रम भव्य दिव्य असा केला जाईल.

मुंबई- बेंगलोर महामार्गावर विविध सुविधांसह औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक युवकांना मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतमालालाही चांगला भाव मिळणार यामुळे या भागातील स्थालांतर कमी होईल.केंद्र शासनाचा देशभरात रस्त्याचे जाळे निर्माण करण्यावर भर राहिला आहे.

महाराष्ट्राला ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा आहे. संत वाङमय हे डिजिटल पध्दतीने तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून श्री. गडकरी म्हणाले, फलटण शहरांतर्गत 9 कि.मी. चा रस्ता पूर्ण केला जाईल.फलटण -दहिवडी या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करुन सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल. तसेच लोकप्रतिनिधींनी विविध विकास कामांना निधीची मागणी केली आहे. त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

राष्ट्रीय महामार्ग महामंडळाचे काम जिल्ह्यात चांगल्या प्रकारे सुरु असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी सांगितले.

खासदार श्री नाईक निंबाळकर म्हणाले, पालखी मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला – पालखी मार्गासाठी जमिन संपादन केलेल्या लोकांना योग्य मोबदला देण्यात आला आहे.. माढा लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामासाठी गडकरी साहेबांनी नेहमीच सहकार्य केले आहे.फलटण शहरातील विकास कामांनाही निधी मिळवा अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी आमदार सर्वश्री रामराजे नाईक निंबाळकर व शहाजी पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती करावी. -केद्रीय मंत्री नितीन गडकरी

साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती करावी. -केद्रीय मंत्री नितीन गडकरी

सर्व शासकीय यंत्रणांनी पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परांत समन्वय ठेवावा -प्रधान सचिव प्रवीण दराडे

सर्व शासकीय यंत्रणांनी पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परांत समन्वय ठेवावा -प्रधान सचिव प्रवीण दराडे

सर्व शासकीय यंत्रणांनी पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परांत समन्वय ठेवावा -प्रधान सचिव प्रवीण दराडे

जिल्ह्यातील सर्व शेती खातेदारांना घरपोच सातबारा वितरण मोहिमेअंतर्गत 100 टक्के सातबाराचे वाटप - पालकमंत्री दीपक केसरकर

जिल्ह्यातील सर्व शेती खातेदारांना घरपोच सातबारा वितरण मोहिमेअंतर्गत 100 टक्के सातबाराचे वाटप – पालकमंत्री दीपक केसरकर

जिल्ह्यातील सर्व शेती खातेदारांना घरपोच सातबारा वितरण मोहिमेअंतर्गत 100 टक्के सातबाराचे वाटप - पालकमंत्री दीपक केसरकर

महाराष्ट्र-शासन-उपक्रम-महाराष्ट्र-शासन-योजना-सरकारी-योजना (2)

उन्हाळी हंगाम २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे – कृषि सहसंचालकांचे आवाहन

उन्हाळी हंगाम २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे - कृषि सहसंचालकांचे आवाहन

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरुवात….

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरुवात.... ग्रामपंचायतींनी प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार बाबतचे ठराव घ्यावेत

तुर, हरभरा व गहू पिकावरील किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन । शेतीविषयक

कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन |कृषि विभाग

कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन |कृषि विभाग

सकस आहार तिरंगा थाळी स्पर्धेचे उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण । राज्य शासन अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण । राज्य शासन अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना । शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना । शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्याला 220 शेततळ्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून शेतक-यांना शेततळ्यासाठी कमाल 75 हजार रुपयाच्या मर्यादेत शेततळ्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी अँपद्वारे पीक पेरा नोंदवण्यासाठी तीन दिवसीय विशेष मोहिम - 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत मोहिम

रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी अँपद्वारे पीक पेरा नोंदवण्यासाठी तीन दिवसीय विशेष मोहिम – 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत मोहिम

शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, पीक नोंदणी प्रक्रीयेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग वाढवा, कृषी पतपुरवठा धोरण सुलभ व्हावे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेतंर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने ई-पीक पाहणी उपक्रम सुरु केला आहे.

आत्माच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला बळकटी । शेतकऱ्यांनी परस बागेत का होईना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवावा

आत्माच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला बळकटी । शेतकऱ्यांनी परस बागेत का होईना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवावा

आपल्या शेतीतील उत्पादीत मालामधून रासायनिक घटकांचे प्रमाण रासायनिक खते, औषधी यामुळे वाढून त्याचा मानवी आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी परस बागेत का होईना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवावा, असे आवाहन आत्मा प्रकल्प संचालक शीतल चव्हाण यांनी केले आहे.