Sakshidar Health Mantra || फळे व कड धान्य चे फायदे || Benfits of Fruit for Health

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक  रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच, भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने सांगितले आहे की, फळ आणि भाज्या व्हिटॅमिन-सी समृद्ध असतात. याद्वारे आपण कोरोना संक्रमण आणि कोरोना विषाणूचे आक्रमण टाळू शकतो. तर आजच्या या लेखात आपण पाहुयात काही फळे व कड धान्य चे आपल्याला काय फायदे मिळतात.  


आरोग्या साठी “डाळिंब”चे फायदे माहित करून घ्या!

डाळींब हे असे फळ आहे जे वर्षभर सहज उपलब्ध होत असते आणि जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामध्ये अँटीऑक्‍सिाडंट, फायबर, व्हिटॅमिन असतात. 

डाळिंब खाण्याचे फायदे पाहुयात… 

        ● डाळिंब खाल्याने उष्णता कमी होते व त्वचा तजेलदार राहते.
        ● डाळिंब खाल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
        ● डाळिंब खाल्याने रक्ताची कमतरता जाणवत असेल तर रोज डाळिंबाचा ज्यूस घ्यावा.
        ● डाळिंब खाल्याने शरीरातील इम्युन सिस्टम मजबूत होते.
        ● डाळिंब खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
        ● डाळिंब खाल्याने अपचन, पोटात गॅस होणे, शैचास साफ न होणे आदी बाबींसाठी फायदेशीर ठरते.
        ● डाळिंब खाल्याने तोडांस दुर्गंधी येत असेल तर डाळींबाचे दाणे चावून खावेत.
        ● जुलाब होत असल्यास डाळींब खावे किंवा डाळिंबाचा ज्यूस प्यावा.


आरोग्या साठी ‘चवळी’ खाण्याचे ‘हे’ फायदे माहित करून घ्या!

चवळी हे कडधान्य देखील आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असे आहे. चवळीचे नियमित सेवन केल्यास अनेक आजार आपणापासून दूर राहू शकतात. म्हणून चवळी खाण्याचे फायदे जाणून घेवूयात…

आरोग्या साठी चवळी खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे … 

        मधुमेह : या आजाराच्या रुग्णांसाठी चवळी फार फायदेशीर आहे. कारण यामध्ये कॅल्शिअम अधिक                    आहेत. यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारावर नियंत्रण राहते. 
        पोट साफ होते : उभा ल सोल्यूबल फायबर उच्च असल्यामुळे पचनशक्ती सुधारते. चवळीमुळे                             बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
        लठ्ठपणा : चवलीमध्ये असणारे प्रोटिन रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करते तसेच शरीरातील वाईट             कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवते. तसेच त्यामुळे चरबी कमी होते.
        गरोदर महिलांना उपयुक्त : अशा महिलांनी चवळी खाल्ल्यामुळे त्यांची कॅल्शिअमची झीज भरून निघते             आणि बाळाची योग्य वाढ होते. 
        हृदयरोग : यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. चवळीमुळे लोहाची कमतरता भरून निघते                 आणि हृदयरोग दूर राहतात. .


“अंजीर खाण्याचे” हे फायदे माहित करून घ्या!

बजारात ताज्या अंजीरप्रमाणेच सुकी अंजीर वर्षभर उपलब्ध असतात. या अंजीरमध्ये असणारे विविध तत्व आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. आज आपण त्याबाबत जाणून घेऊयात…  

आरोग्या साठी अंजीर खाण्याचे फायदे पाहुयात… 

        ● ताजे अंजीर सालीसकट खाल्ल्याने अधिक फायदा होतो. कारण त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर                     असतात. 
        ● अंजीर यामध्ये कॅल्शियम घटक भरपूर प्रमाणात असल्याने हाडांना मजबुती मिळते.
        ● अंजीर यामध्ये फायबर असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. 
        ● अंजीर यामध्ये असणारे पोटॅशियम रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
        ● अंजीर यामध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड असतात. हृदयाचे आजार आटोक्‍यात राहण्यास                 मदत होते.
        ● अंजीर यामध्ये व्हिटॅमिन ‘इ’ आणि ‘के’ चांगल्या प्रमाणात असल्याने केसांची नैसर्गिक चमक आहे तशीच             राहते.
        ● सुके अंजीर गुडघ्याचे दुखणे कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. 
        ● अंजीर हे अँटीऑक्‍साडेंटच प्रमुख स्त्रोत असल्याने शरीरातील फ्री रेडिकल्स नष्ट करून वेगवेगळ्या                         आजारापासून आपला बचाव करते.


आरोग्या साठी “लवंग” चे फायदे माहित करून घ्या!

आपल्याकडे लवंगचा वापर प्रामुख्याने मसाला म्हणून वापरण्यात येतो. पण त्याचे काही फायदेशीर गुणधर्म सुद्धा आहेत. त्यावर एक नजर… 

लवंग खाण्याचे फायदे पाहुयात… 

        ● दाताच्या दुखवण्यावर होणाऱ्या तीव्र वेदनांना कमी करण्यात लवंग अतिशय फायदेशीर ठरते.
        ● तुमच्या मुखातून दुर्गंध येत असेल तर लवंग यासाठी सर्वोत्तम उपाय आहे.तसेच लवंग खाल्याने                         तुम्हाला फ्रेशही वाटेल. 
        ● मळमळ किंवा उलटी थांबविण्यासाठी सुद्धा लवंग हा उत्तम पर्याय आहे.
        ● लवंग हा पोटदुखीवर तसेच पचनक्रिया सुस्थितीत आणण्यास फायदेशीर ठरते. 
        ● डोकेदुखी, टाचांमध्ये उत्पन्न होणाऱ्या वेदनांना कमी करण्यास, तसेच शरीराची प्रतिरोधक क्षमता                        वाढवण्याचे काम लवंग करते.
        ● मायग्रेन, सर्दी, कानातील इन्फेकशनसाठी लवंग च्या तेलाचा वापर आपण करू शकता. 
        ● लवंगात अँटी ऑक्‍सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढीस लागते. 

…म्हणून रोज सकाळी “मोड आलेले कडधान्य” खा…!

दररोज सकाळी मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने शरीराला आरोग्यदायी फायदे मिळतात. तसेच  आपली अनेक आजारांपासून सुटका होते. चला तर मग याचे फायदे जाणून घेऊयात…

मोड आलेले कडधान्य खाण्याचे फायदे पाहुयात… 

        ● मोड आलेले धान्य खाल्ल्याने तुमची दृष्टी सुधारते. तसेच डोळ्यांच्या सर्व विकारापासून सुटका होते.
        ● मोड आलेल्या कडधान्यात मोठ्या प्रमाणात फायबर्स असल्याने पोट लवकर भरते व भुक लागत नाही. 
        ● अंकुरित धान्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स असतात. त्यामुळे पचकक्रिया व्यवस्थित होते.
        ● मोड आलेले कडधान्य खाल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर             टाकली जातात.
        ● मोड आलेले कडधान्य या धान्यातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स केस आणि त्वचेसाठी फायदेशीर                     असतात. 
         ● मोड आलेले कडधान्य खाल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.    
        ● मोड आलेले कडधान्य खाल्याने ह्रदयरोगाची समस्या दूर होते. कारण अंकुरित धान्यामुळे रक्तातील                    कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. 


 आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊयात!

        ● दररोज सकाळी थोडासा वेळ दीर्घश्वसनासाठी द्या. याने फुप्फुस, पोटांच्या स्नायूंचा व्यायाम होईल.
        ● सकाळी अस्सल देशी नाश्ता करा. आणि ओट्स, बेकरी पदार्थ, शिळे पदार्थ, मॅगी खायचे टाळा.
        ● दररोज एक वेळेच्या जेवणात वरण, भात, तूप, लिंबू सारख्या पदार्थांचा समावेश करा. 
        ● फोडणी करताना हिंग, मेथी दाणे, हळद, कडीपत्ता पानांची पावडर भरपूर प्रमाणात वापर करा. हिंग,                     मेथी दाणे, हळद, कडीपत्ता पानांची पावडर भरपूर प्रमाणात वापरल्यामुळे हाडांचे विकार होणार नाहीत.
        ● ज्वारीची भाकरी, फळभाजीचा आहारात समावेश केल्यास पचन प्रकियेच्या समस्या दूर होतील.
        ●शारीरिक दुखण्यापासून दूर राहण्यासाठी आहारात कडीपत्ता चटणी, जवस चटणी, तीळ चटणी, शेवगा                यांचा भरपूर प्रमाणात वापर करा.  


व्हिटॅमिन-सी युक्त ‘या’ गोष्टींचा आहारात करा समावेश!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक  रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच, भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने सांगितले आहे की, फळ आणि भाज्या व्हिटॅमिन-सी समृद्ध असतात. याद्वारे आपण कोरोना संक्रमण आणि कोरोना विषाणूचे आक्रमण टाळू शकतो. त्याबाबत अधिक जाणून घेऊयात… 
व्हिटॅमिन सी महत्वाचे का? : व्हिटॅमिन-सी ने समृध्द असणारे अन्न रोग प्रतिकारशक्ती आणि चयापचय बळकट करून आपल्या शरीराचे रोगांपासून संरक्षण करते. आज आपण अशाच 6 फळ आणि भाज्यांबद्दल पाहुयात.
● आवळा.
● पपई.
● पेरू.
● शिमला मिर्ची.
● संत्री.
● लिंबू.
———————————————
Disclaimer : आरोग्य मंत्र लेखात दिली गेलेली माहिती हि प्राथमिक स्वरुपाची व संकलित केलेली आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर किंवा वैद्यकीय तज्ञाकडून याबाबत खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी आम्ही घेत नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment