महाराष्ट्र शासन योजना

सार्वजनिक जल स्त्रोतामधुन पिण्याच्या पाण्याशिवाय पाणी उपसा करण्यास आदेशान्वये प्रतिबंध

जालना, दि. १९ जानेवारी (आजचा साक्षीदार) : सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अंतिमतः जाहीर करुन पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत संरक्षित होण्याच्या दृष्टिकोनातून या स्त्रोतापासून 500 मीटरच्या आत पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनाशिवाय अन्य कारणासाठी स्त्रोत निर्माण करण्यास अथवा सदर सार्वजनिक जल स्त्रोतामधुन पिण्याच्या पाण्याशिवाय पाणी उपसा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी जारी केले आहेत.

महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 कलम 20 प्रमाणे तसेच महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम, 2009 मधील तरतुदीनुसार दरवर्षी निर्माण होणारे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत जाहीर करून सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचे (उदभवाचे) रक्षण करण्याची कार्यवाही होणे महत्वाचे आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे सन 2021-22 या कालावधीची जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील 04 गावे (धाकलगाव, अजिमनगर (सौंदलगाव), देशगव्हाण, आवा), बदनापूर तालुक्यातील 01 गाव (देवपिंपळगाव), भोकरदन तालुक्यामधील 03 गावे (समर्थनगरी (नळणी), पळसखेडा (मुर्तड), चांदई ठोंबरी), व जाफ्राबाद तालुक्यामधील 03 गावे (आळंद, गाढेगव्हाण, देऊळझरी) असे एकुण 11 गावांतील निर्माण करण्यात आलेल्या स्त्रोताचे दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजीच्या जाहीर प्रगटनाव्दारे सावर्जनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद, जालना, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जालना, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जालना सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती तसेच या कार्यालयाच्या स्तरावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

या स्त्रोताबाबत काही व्यक्ती अथवा जनतेच्या काही मागण्या अथवा हरकती असल्यास त्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे हे जाहीर प्रगटन प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासुन (15) दिवसाच्या आत लेखी स्वरुपात मागण्या, सूचना अथवा हरकती सबळ पुराव्यानिशी सादर कराव्यात. विहीत केलेल्या मुदतीत तहसिलदार यांच्याकडे मागण्या सूचना अथवा हरकती प्राप्त झाल्यास तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास कळविण्यात यावे असे जाहीर प्रगटनामध्ये नमुद केले होते.

जाहीर प्रगटनाचा पंधरा दिवसाचा कालावधी देण्यात येऊन जिल्ह्यातील संबंधित तहसिलदार यांच्याकडुन तसेच या कार्यालयाच्या स्तरावर सदर जाहीर प्रगटनावर आजपर्यंत एकही लेखी स्वरुपात मागणी, सुचना अथवा हरकती प्राप्त झाल्या नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर प्रसिध्द करण्यात आलेले स्त्रोत अंतीम समजण्यात येऊन या स्त्रोताचे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत असल्याचे आदेशान्वये जाहीर करण्यात येत आहे.
या आदेशाचा भंग केल्यास महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम, 2009 अन्वये जालना जिल्हयातील संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आवश्यक कार्यवाही करावी.तसेच सदर बाबी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद जालना तसेच संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी यांनी वेळोवेळी होणाऱ्या बैठकीमध्ये आढावा घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीसाठी प्रकरण सक्षम अधिकाऱ्याकडे पाठवावीत. सदरचे आदेश महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम, 2009 मधील कलम 20 नुसार प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करुन निर्गमित करण्यात येत आहेत. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

सार्वजनिक जल स्त्रोतामधुन पिण्याच्या पाण्याशिवाय पाणी उपसा करण्यास आदेशान्वये प्रतिबंध

सार्वजनिक जल स्त्रोतामधुन पिण्याच्या पाण्याशिवाय पाणी उपसा करण्यास आदेशान्वये प्रतिबंध

सार्वजनिक जल स्त्रोतामधुन पिण्याच्या पाण्याशिवाय पाणी उपसा करण्यास आदेशान्वये प्रतिबंध

बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

एकलव्य निवासी पब्लिक स्कुलमध्ये प्रवेश परीक्षेकरीता अर्ज आमंत्रित

एकलव्य निवासी पब्लिक स्कुलमध्ये प्रवेश परीक्षेकरीता अर्ज आमंत्रित

एकलव्य निवासी पब्लिक स्कुलमध्ये प्रवेश परीक्षेकरीता अर्ज आमंत्रित

महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी

महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी

महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील सर्व तीर्थक्षेत्रांवर भाविक आणि यात्रेकरू मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. भाविकांची सोय आणि नियोजनासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील गायमुख यात्रा आणि इतर यात्रांबाबत आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्याचे आवाहन

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्याचे आवाहन

केंद्र शासनाने 01 जानेवारी, 2023 पासून मोफत अन्नधान्य वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दि. 01 जानेवारी ते दि. 31 डिसेंबर, 2023 या कालावधीत अनुज्ञेय असेलेले अन्नधान्य मोफत वितरीत करण्यात येणार आहे. उदा. माहे नोंव्हेंबर, 2022 किंवा डिसेंबर, 2022 साठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या अन्नधान्याचे वितरण दि. 01 जानेवारी, 2023 किंवा त्यानंतर करण्यात येत असल्यास ते अन्नधान्य लाभार्थ्यांना मोफत वितरीत करावे.

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडाचा शुभारंभ । मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांचे प्रयन्त आवश्यक - मान्यवरांचे सूर

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडाचा शुभारंभ । मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांचे प्रयन्त आवश्यक – मान्यवरांचे सूर

मराठी भाषा ही आपली मायबोली भाषा असून अनेक बोलीभाषेने ती समृद्ध झाली आहे. मराठी भाषा केवळ एक संवादाचे माध्यम नसून आपल्या वागण्या, बोलण्यातून आपले व्यक्तिमत्वच नव्हे तर आपली संस्कृतीचा परिचय देतो. त्यामुळे प्रत्येकांनी आपल्या मातृभाषेविषयी अभिमान बाळगून ती समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावा, असा सूर सर्व मान्यवरांनी आजच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.

अनुसूचित जमातीच्या कुटुंबांनी शिधापत्रिका व जात प्रमाणपत्र विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन

अनुसूचित जमातीच्या कुटुंबांनी शिधापत्रिका व जात प्रमाणपत्र विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन

अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत स्थानिक प्रकल्प अधिकारी यांच्या वतीने दि. 01 जानेवारी ते 31 जानेवारी, 2023 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

अंमली पदार्थाच्या वापरास आळा घालण्यासाठी पोलीसांनी धडकपणे कार्यवाई करावी । नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी अंमली पदार्थांबाबत पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

अंमली पदार्थाच्या वापरास आळा घालण्यासाठी पोलीसांनी धडकपणे कार्यवाई करावी । नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी अंमली पदार्थांबाबत पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

अंमली पदार्थाच्या वापरास आळा घालण्यासाठी पोलीसांनी धडकपणे कार्यवाई करावी । नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी अंमली पदार्थांबाबत पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करण्याचे आवाहन

निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करण्याचे आवाहन

जिल्ह्यात डिसेंबर 2022 मध्ये पार पडलेल्या 113 ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये निवडणूक लढविलेल्या 2 हजार उमेदवारांनी आपल्या निवडणूक काळातील खर्चाचा हिशोब दि.20 जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा ग्रामपंचायत निवडणूकचे प्रभारी अधिकारी यांनी केले आहे.

‘गाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची’ हा विशेष कार्यक्रम मंगळवारपासून आकाशवाणी केंद्रावर

‘गाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची’ हा विशेष कार्यक्रम मंगळवारपासून आकाशवाणी केंद्रावर

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय आणि आकाशवाणी केंद्र परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्रामात हिंगोली जिल्ह्याने दिलेल्या योगदानाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘गाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या श्रोत्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी आणि आकाशवाणी परभणी केंद्र प्रमुख सतिष जोशी यांनी केले आहे.