सरकारी योजना

अंमली पदार्थाच्या वापरास आळा घालण्यासाठी पोलीसांनी धडकपणे कार्यवाई करावी । नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी अंमली पदार्थांबाबत पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जालना, दि.१६ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) – अंमली पदार्थ शरीरास अत्यंत घातक आहेत. विशेषत: तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्हयात अंमली पदार्थांच्या विरोधात धडकपणे कार्यवाई करावी. आपल्या परिसरात जर अंमली पदार्थांची विक्री, वाहतुक अथवा साठवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी त्याबाबतची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला तात्काळ उपलब्ध करुन द्यावी. ग्रामीण भागात सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी गावात अंमली पदार्थ वापराबाबत किंवा शेतात गांजा या पिकाची लागवड केल्याचे आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

  • शाळा, महाविद्यालयस्तरावर अंमली पदार्थविरोधात जनजागृती करावी
  • विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवन न करण्याची शपथ द्यावी
  • मेडिकल स्टोअरवरील गुंगीकारक औषधांचा साठा तपासावा
  • कुरिअर सेवा, ट्रॅव्हल्स वाहनांची तपासणी करण्यात यावी

अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, या प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त वर्षा महाजन, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर, केंद्रीय उत्पादन विभाग, आरोग्य विभाग, टपाल विभाग व शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच त्याच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा व महाविद्यालयस्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावेत आणि या कार्यक्रमात अंमली पदार्थासारख्या नशेच्या आहारी जाणार नाही याबाबतची शपथ विद्यार्थ्यांना प्राधान्याने द्यावी. पोलीस विभागाने गांजा लागवडी विरोधात अलीकडे मोठया प्रमाणात कारवाई केली, ही बाब कौतुकस्पद असून जिल्ह्यात अंमली पदार्थ प्रकरण उघडकीस आल्यास वेळोवेळी कठोर कारवाई करुन अंमली पदार्थांची वाहतूक, विक्री तसेच साठवणूक करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी.

कुरिअर सेवा, खाजगी ट्रॅव्हल्स यांच्यामार्फत अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक होण्याची शक्यता असल्याने त्यांची अचानक तपासणी करावी. औषध विक्रेत्यांनी गुंगीकारक औषधांची डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात विक्री करु नये. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मेडीकल स्टोअरवरील गुंगीकारक औषधांचा साठा वेळोवेळी तपासून तो अधिकृतरित्या नियमाप्रमाणे खरेदी केला आहे का, याची काटेकोर तपासणी करावी. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

अंमली पदार्थाच्या वापरास आळा घालण्यासाठी पोलीसांनी धडकपणे कार्यवाई करावी । नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी अंमली पदार्थांबाबत पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

अंमली पदार्थाच्या वापरास आळा घालण्यासाठी पोलीसांनी धडकपणे कार्यवाई करावी । नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी अंमली पदार्थांबाबत पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

अंमली पदार्थाच्या वापरास आळा घालण्यासाठी पोलीसांनी धडकपणे कार्यवाई करावी । नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी अंमली पदार्थांबाबत पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करण्याचे आवाहन

निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करण्याचे आवाहन

जिल्ह्यात डिसेंबर 2022 मध्ये पार पडलेल्या 113 ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये निवडणूक लढविलेल्या 2 हजार उमेदवारांनी आपल्या निवडणूक काळातील खर्चाचा हिशोब दि.20 जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा ग्रामपंचायत निवडणूकचे प्रभारी अधिकारी यांनी केले आहे.

‘गाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची’ हा विशेष कार्यक्रम मंगळवारपासून आकाशवाणी केंद्रावर

‘गाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची’ हा विशेष कार्यक्रम मंगळवारपासून आकाशवाणी केंद्रावर

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय आणि आकाशवाणी केंद्र परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्रामात हिंगोली जिल्ह्याने दिलेल्या योगदानाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘गाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या श्रोत्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी आणि आकाशवाणी परभणी केंद्र प्रमुख सतिष जोशी यांनी केले आहे.

जी-२० बैठकीसाठी रविवारी ३८ प्रतिनिधींचे आगमन

जी-२० बैठकीसाठी रविवारी ३८ प्रतिनिधींचे आगमन

पुणे येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित बैठकीसाठी दिवसभरात विविध देशांच्या सुमारे ३८ प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आज आगमन झाले. आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे जी-२० समूहाच्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, जपान, अर्जेंटिना, जर्मनी या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविक, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविक, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविक, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील । अक्कलकोट व पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठकीत सूचना

आधार नोंदणीला दहा वर्षे झालेल्या नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे - जिल्हाधिकारी

आधार नोंदणीला दहा वर्षे झालेल्या नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे – जिल्हाधिकारी

आधार नोंदणीला दहा वर्षे झालेल्या नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे - जिल्हाधिकारी

राज्यात ड्रग्जविरोधात अभियान राबविणार: देवेंद्र फडणवीस । पुण्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परिषद

राज्यात ड्रग्जविरोधात अभियान राबविणार: देवेंद्र फडणवीस । पुण्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परिषद

राज्यात ड्रग्जविरोधात अभियान राबविणार: देवेंद्र फडणवीस । पुण्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परिषद

प्राण्यांची वाहतुक व बाजारास अटींच्या अधीन राहून मान्यता

प्राण्यांची वाहतुक व बाजारास अटींच्या अधीन राहून मान्यता

जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाची मोठया प्रमाणावर लागन झाल्याने राज्यात जनावरांचा बाजार भरविणे तसेच जिल्ह्यांतर्गत वाहतुक करणे यावर बंदी घालण्यात आली होती. काही अटी व शर्तीच्या अधीन राहून वाहतुक व बाजारास मान्यता देण्यात आली आहे. मात्र अटींचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

महाडीबीटी पोर्टलच्या महाविद्यलय, विद्यार्थी लॉगीनवरील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

महाडीबीटी पोर्टलच्या महाविद्यलय, विद्यार्थी लॉगीनवरील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

महाडीबीटी पोर्टलच्या महाविद्यलय, विद्यार्थी लॉगीनवरील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन