सरकारी योजना

कोल्हापूर दि.१३ मे २०२३ (आजचा साक्षीदार) : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या बदललेल्या स्वरुपानुसार अपघातग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना स्थानिक तालुका पातळीवर सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दि. 19 एप्रिल 2023 नंतर या योजनेमध्ये समावेश असणा-यांचा अपघातामुळे मृत्यू ओढावला अथवा कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आल्यास गावपातळीवरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले आहे

सन 2021-22 करिता या योजनेचा कालावधी 7 एप्रिल 2021 ते 6 एप्रिल 2022 असा होता. त्यानंतच्या कालावधीमध्ये ही योजना पुढे सुरु ठेवण्यात आली नव्हती. परंतु, शासनाने विशेष बाब म्हणून दिनांक 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये झालेल्या अपघातासाठी मान्यता दिली आहे.

या कालावधीमध्ये जिल्ह्यातील 106 विमा दावे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी मंजूर झालेल्या 44 विमा दाव्यांना मार्च 2023 मध्ये 87 लाख रुपये अनुदान वितरीत केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालय 0231-2654603 दूरध्वनीवर संपर्क साधावा, असेही श्री. दिवेकर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेबाबत आवाहन

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेबाबत आवाहन

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या बदललेल्या स्वरुपानुसार अपघातग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना स्थानिक तालुका पातळीवर सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दि. 19 एप्रिल 2023 नंतर या योजनेमध्ये समावेश असणा-यांचा अपघातामुळे मृत्यू ओढावला अथवा कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आल्यास गावपातळीवरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले आहे

मराठा उद्योजक घडविण्यासाठी शासनाचा सामंजस्य करार

मराठा उद्योजक घडविण्यासाठी शासनाचा सामंजस्य करार

शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त मराठा उद्योजक घडविण्याकरिता बँक ऑफ इंडिया व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामध्ये सामंज्यस करार करण्यात आला.

माविमच्या दिव्यांग जागृती व विकासाच्या "स्पार्क" कार्यक्रमाची सुरुवात

माविमच्या दिव्यांग जागृती व विकासाच्या “स्पार्क” कार्यक्रमाची सुरुवात

महिला आर्थिक विकास महामंडळाकडून जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना विशेष विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इंटरनँशनल लेबर ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने स्पार्क हा पथदर्शी कार्यक्रम जिल्हात राबविण्यात येत आहे." स्पार्क " हा आंतरराष्ट्रीय कृषीविकास निधी (IFAD) चा एक महत्वकांक्षी प्रकल्प आहे.(लाईट फॉर दि वर्ल्ड), आंतरराष्ट्रीय कामगार संघटना व प्रोकासूट यांच्यासह एक संयुक्त पद्धतीने स्पार्क (SPARK) कार्यक्रम जगातील बुरकिना फासो,भारत, मोझांबिक आणि मालदिव या चार देशात राबविण्यात येत आहे. देशात २०११ च्या जनगणनेनुसार एकूण २ कोटी ६८ लक्ष व्यक्ती दिव्यांग आहेत,जे एकूण

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

वाशिम जिल्‍हा हा सोयाबीनचे हब म्‍हणुन ओळखला जातो. एकुण खरीप लागवड क्षेत्रापैकी जवळपास ७५ टक्‍के क्षेत्रावर सोयाबीन पिक घेतल्‍या जाते. त्‍यामुळे जिल्‍हयाचे संपूर्ण अर्थकारण या सोयाबीन पिकावर अवलंबुन आहे. सध्‍याची सोयाबीन पिकाची उत्‍पादकता लक्षात घेता उत्‍पादकता वाढीसाठी फार मोठा वाव आहे. सन २०२२-२३ या वर्षातील जिल्‍हयाची सोयाबीनची सरासरी उत्‍पादकता १३८१ किलो प्रति हेक्‍टर आहे. ती सन २०२३-२४ या वर्षात वाढवुन १९३७ किलो करण्‍याचे उदिष्‍टे कृषि विभागाने निश्‍चीत केले आहे.

उद्योजकता विकास केंद्राचा बंजारा ड्रेस मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम 20 मेपर्यंत प्रशिक्षण इच्छूकांनी संपर्क साधावा

उद्योजकता विकास केंद्राचा बंजारा ड्रेस मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम 20 मेपर्यंत प्रशिक्षण इच्छूकांनी संपर्क साधावा

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांसाठी सर्वसाधारण योजना सन 2023-24 अंतर्गत सहशुल्क स्वरूपाच्या बंजारा ड्रेस मेकिंगवर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार | शेतकऱ्यांनी गाळ काढण्यासाठी अर्ज करावे

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार | शेतकऱ्यांनी गाळ काढण्यासाठी अर्ज करावे

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानामुळे धरण/ तलावातील गाळ उपसून तो शेतात पसरविल्यास कृषी उत्पादनात वाढ होण्यासोबतच धरणाची/ तलावाची मुळ साठवण क्षमता पुर्नस्थापित होण्यास मदत होणार आहे. यासाठी ज्या गावाच्या परिसरात धरण/तलाव आहे आणि त्यामध्ये मोठया प्रमाणात गाळ आहे.

अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध | समाजमाध्यमातील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

महा-डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असून समाजमाध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

दहा वर्षापूर्वी काढलेले आधार कार्ड अद्यावत करा; जिल्हाधिकारी यांचे आवाहन

दहा वर्षापूर्वी काढलेले आधार कार्ड अद्यावत करा; जिल्हाधिकारी यांचे आवाहन

केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या युआयडीएआय विभागाने नवे नियम जारी केले आहे. नियमानुसार दहा वर्षापूर्वी काढण्यात आलेले आधार कार्ड नव्याने अद्ययावत (अपडेट) करणे प्रत्येकाला अनिवार्य करण्यात आले आहे. अद्यावत न केलेले आधार कार्ड रद्द करण्यात येणार आहे. तरी जिल्हातील सर्व नागरिकांनी आधार कार्ड अद्यावत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

उद्योजकता विकास केंद्राचे ब्युटी पार्लर प्रशिक्षण

उद्योजकता विकास केंद्राचे ब्युटी पार्लर प्रशिक्षण

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांसाठी सर्वसाधारण योजना सन २०२३-२४ अंतर्गत सहशुल्क स्वरूपाच्या ब्युटीपार्लर (ब्युटी अँड वेलनेस)" वर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

खरीप हंगाम 2023-24 साठी जिल्हयात मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने नियोजन केले आहे. पीक संरचनेतील बदल व खत वापराच्या शिफारशी प्रमाणे जिल्हयासाठी एकुण 89 हजार 318 मे.टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली असून 80 हजार 180 मे.टन खताचे आवंटन व 28 हजार 350 बॉटल नॅनो युरीयाचे आवंटन शासनाकडून प्राप्त झाले आहे. रब्बीतील सुमारे 29 हजार 526 मे.टन साठा जिल्हयामध्ये शिल्लक आहे.